पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर;पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या जाणून घेतल्या व्यथा

कणकवली:
जिल्हातील पाऊस एकाकी गायब झाल्याने शेतात जमिनीला भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्हातील विविध भागात जमीन सुकून भेगा पडण्याबरोबर भाताची रोपेही करपायला लागली असल्याने मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.नितेश राणे यानी कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

यावेळेस माजी जि.प.सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार,कणकवली मंडलाध्यक्ष दिलीप तळेकर,मिलिंद मेस्त्री,माजी सभापती बंडया मांजरेकर,जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे,तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उप कृषि अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रविण ओहळ, मंडल कृषी अधिकारी अर्जुन जाधव, ग्रामपंचायत अधिकारी राजलक्ष्मी पेडणेकर, कृषी सेवक गजानन पवार,भात संशोधन केंद्र फोंडाघाटचे डॉ.विजय कुमार शेटये, पोलिस पाटील चंद्रकांत चव्हाण,मिठबाव सरंपच भाई नरे,ग्रा.पं.सदस्य रिया चव्हाण,राजू जठार,दिनेश मुद्रस,रविंद्र चव्हाण, सुनील चव्हाण, देविदास चव्हाण, सिद्धेश जगताप, विठोबा चव्हाण,राजेश भोगले,राजू वळंजू, अशोक भोगले,अजय चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी देवीदास चव्हाण व इतर शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित कृषी अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. ठिकाणी मी व प्रशासकीय अधिकारी पाहणी करायला आलो आहोत.या यंत्रणेमार्फत शेतक-यांना काय मदत करु शकतो.कोणत्या निकषात बसवून मदत कशी करायाची यासाठी पाऊले उचलू. अशी ग्वाही यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top