कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन तरुणांनी अत्याधुनिक शेतीकडे वळावे:जिल्हा परीषद अध्यक्ष प्रमोद कामत
सिंधुदुर्गनगरी: शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडलेली मोठी उद्योगसाखळी आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीचा स्वीकार केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून कृषी क्षेत्रात नवे प्रयोग करण्याची गरज असल्याचे जिल्हा परीषद अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले.कृषी विभाग…
