मालवण प्रतिनिधी
पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवणात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वैभव नाईक आणि शहर विकास आघाडीवर जोरदार टीका करत ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेनेच्या दुहेरी राजकारणाचा पर्दाफाश केला. कणकवलीत दोन्ही सेना एकत्र आणि मालवणात मात्र एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्याने ही ‘मॅच फिक्सिंग’ असल्याचा आरोप राणेंनी केला.
मालवणात ठाकरे शिवसेनेचे पारंपरिक मतदान वर्षानुवर्षे राणे विरोधात जाते, मात्र कणकवलीत त्याच ठाकरे शिवसेनेसह शिंदे शिवसेनेला घेऊन शहर विकास आघाडी उभारली जाते, यावर प्रश्न उपस्थित करत राणेंनी वैभव नाईकांना थेट लक्ष्य केले. कणकवलीत शिंदे शिवसेनेसह खांद्याला खांदा लावून मते मागणारे वैभव नाईक मालवणात मात्र ठाकरे शिवसेनेसोबत वेगळे उभे राहतात; हीच मतदारांची मोठी फसवणूक असल्याचे राणे म्हणाले.
