जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीत जिल्हा बँकेचा हातभार असून मनीष दळवीं सारखे अभ्यासू नेतृत्व जिल्हा बँकेला राणेसाहेबांनी दिले त्यांचे आभार :प्रमोद कामत

जिल्हा बँक मठ शाखा स्थलांतर सोहळा संपन्न
वेंगुर्ला प्रतिनिधी:
आर्थिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा लहान असला तरी या वर्षी बँकेने ७००० कोटींचा व्यवसाया चा टप्पा पूर्ण केला व बँकेच्या ठेवींमध्ये सुध्दा वाढ झाली एवढा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष व संचालक मंडळावर ग्राहकांनी, जिल्हावासियांनी दाखवला हे काम कौतुकास्पद असेच आहे.राणेसाहेबांनी नेतृत्व हेरून अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा हिरा जिल्हा बँकेला मनीष दळवी यांच्या स्वरूपात बँकेला अध्यक्ष म्हणून दिला राणेसाहेबांचे आम्ही आभार मानतो.राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा जिल्हा बँकेतील कर्मचारी आपुलकीने, विश्वासाने बँकींग सेवा देत आहेत.जिल्हा बँकेच्या माध्यमातून मनीष दळवी जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना जिल्हा वासीयांनी साथ द्यावी असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी मठ येथे केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक मठ शाखा नुतन वास्तू स्थलांतर सोहळा संपन्न झाला.नुतन शाखा इमारत स्थलांतर सोहळ्याचे उद्घाटन जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची होती तर जि.प. सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर,प्रकाश मोर्ये, वेंगुर्ला प.स. सभापती शंकर घारे, वेंगुर्ला प.सं सदस्य नितीन मांजरेकर,मठ सरपंच श्रीम. रूपाली नाईक, उपसरपंच सोनाली मठकर, मठ वि.सोसा. चेअरमन सुभाष बोवलेकर,श्री देव स्वयंभू देवस्थान समिती मठ अध्यक्ष मनोहर गावडे आदि मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. बँकेच्या प्रगती व उलाढालीचा वेग १७% च्या पुढे:मनीष दळवी शून्यातून सुरू झालेली बँकेची मठ शाखेकडेआज १६वर्षानंतर सुमारे ९ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत तर मागील एका वर्षात एक कोटी ठेवी शाखेत जमा झाल्या.बँकेच्या सेवेवर येथील ग्राहकानी, ठेवीदारांनी जो विश्वास दाखवला त्यांचे आपण मनापासून अभिनंदन करतो. बँकेची प्रगती किंवा उलाढालीचा वेग हा १२% ते १४ टक्के च्या पुढे कधी गेलेला नाही.पण बँकेने यावर्षी १७% च्या पुढे उलढालीचा वेग प्राप्त केला आहे. ठेवीदारांच्या बँकेतील सुरक्षित ठेवी ठेवण्याच्या दृष्टीने उत्तम कारभार असावा,त्यांचा विश्वास वाढवा,यासाठी बँकेचा कारभार पारदर्शक असावा यासाठी राणेसाहेब नेहमी आग्रही राहिले आहेत. त्यांची एक भूमिका राहिलेली आहे जिल्हा बँकेचा नफा वाढेल तसे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे.त्या दृष्टीने जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून व आम्ही सर्व संचालक मंडळ काम करत आहोत. असे मनीष दळवी शेवटी म्हणाले – उपस्थित मान्यवरांचा तसेच ठेवीदार,विद्यार्थी यांचा पुष्पगुच्छ देउन यावेळी सत्कार करण्यात आला.जिल्हा बँकेचे प्र.मुख्य कार्य अधिकारी दिवाकर देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या सोहळ्यास प्रशासन सरव्यवस्थापक शरद सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,सरव्यवस्थापक के.बी.वरक,मठ शाखा व्यवस्थापक सागर परब, तालुका विकास अधिकारी किशोर गोवेकर,विकास अधिकारी विवेकानंद बागलकर,जिल्हा बँकेचे अधिकारी,कर्मचारी,मठ गावातील ग्रामस्थ, ग्राहक, ठेवीदार मोठ्या संख्येने या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top