सावंतवाडी,ता.१२:
संत श्रेष्ठ रोहिदास यांनी जात-पात भेदाभेद आणि विषमता निर्मूलनाचे विचार मांडले मानव जातीच्या कल्याणासाठी सर्व समान असल्याचे त्यांनी आपल्या विचारातून सांगत असताना “प्रभुजी तुम चंदन हम पानी जा की अंग अंग बास समानी”असा संदेश दिला असून स्वातंत्र्य समता बंधुता आणि समाजात एकी निर्माण व्हावी हे विचार त्यांनी आयुष्यभर मांडले असून त्यांच्या कार्याला सलाम असे प्रतिपादन संत शिरोमणी रोहिदास यांचे गाढे अभ्यासक पी बी चव्हाण यांनी केले.
