पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गात ‘जहाजबांधणी’ची मुहूर्तमेढ
तळवणे येथे झोया मरीनच्या भव्य प्रकल्पाचे १५ ऑगस्टला भूमिपूजन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थिती होणार सोहळा सावंतवाडी प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एकनवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे…
विशेष सखोल पुनरिक्षण (SIR): सिंधुदुर्गची डिजिटायझेशन मध्ये १०० टक्के कामगिरी
प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार सिंधुदुर्गनगरी:भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-२०२६) मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्हा निवडणूक प्रशासनाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या विहित डेटाचे डिजिटायझेशन आणि अनकलेक्टेड फॉर्म्सची कार्यवाही पूर्ण करून १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण…
माजी विद्यार्थी तथा उद्योगपती जी. के.सावंत यांच्याकडून माणगाव हायस्कूलला एक लाखांचा इन्व्हर्टर भेट
माणगाव प्रतिनिधी:श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव या प्रशालेस शाळेचे माजी विद्यार्थी तथा उद्योगपती मा. श्री. जी. के. सावंत यांच्या सौजन्याने रु. १ लाख किमतीचा इन्व्हर्टर भेट स्वरूपात देण्यात आला. दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी ही मोलाची भेट प्रशालेला प्रदान करण्यात आली. शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजासाठी हा इन्व्हर्टर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या…
निळेली पशुपैदास क्षेत्रातील कारभारावर ग्रामस्थांचा संताप;१५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा..!
कुडाळ:माणगाव खोऱ्यातील पशुपैदास केंद्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांचा आक्रमक भूमिका घेतली असून, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत दिपक जयराम काणेकर, मिलिंद रामा धुरी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात शासकीय जागेतील बेसुमार वृक्षतोड, स्थानिक शेतकऱ्यांना योग्य माहिती व प्रशिक्षण न देणे…
हॉटेल, खाद्य व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे;पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एफडीएच्या कारवाया नियमावलीनुसारच; व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांनासह पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे आवश्यक सिंधुदुर्ग:जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मिठाईगृह, बेकरी तसेच अन्य खाद्य व्यवसायिकांनी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे. नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्न मिळणे ही सर्वांचीच सामूहिक…
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सिंधुदुर्गात विविध उपक्रमांचे होणार आयोजन
९ ते १७ ऑगस्टदरम्यान अभियान; नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी:स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, यंदाचे अभियान ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ समर्पित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी…
माजी भारतीय सैनिकांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीत भव्य तिरंगा यात्रा – २०२६
सावंतवाडी:सावंतवाडीच्या भूमीत राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी, देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचा संस्कार देण्यासाठी माजी भारतीय सैनिकांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही तिरंगा यात्रा १० ऑगस्ट २०२६, सोमवार रोजी सकाळी ९.३० वाजता सावंतवाडी शहरात होणार आहे.या यात्रेचा प्रारंभ श्री…
विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, सांघिकता आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करणारा अभिनव उपक्रम. वेंगुर्ले प्रतिनिधी:स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, सांघिकता, सांस्कृतिक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी या उद्देशाने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व विशाल परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुकास्तरीय शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १४…
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनिरुद्ध देसाई यांची नियुक्ती:रिझर्व्ह बँकेची मान्यता
सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अनुभवी व कार्यक्षम अधिकारी श्री. अनिरुद्ध देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीस रिझर्व बँकेने अधिकृत मान्यता दिली असून, त्यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेशजी राणेसाहेब यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय…
पोर्टलवरील थकबाकीची रक्कमच ग्राह्य; शेतकऱ्यांनी संभ्रमात पडू नये
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 सिंधुदुर्गनगरी:राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या एनपीए खात्यांबाबत गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील थकबाकी आणि फार्मर लोन रिलिफ सिस्टिम पोर्टलवरील थकबाकीच्या रकमेमध्ये काही ठिकाणी फरक दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य,…





गाय हा केवळ प्राणी किंवा पशू म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते... आईचे दुसरे रूप गाय आहे... आपल्या आचळातून जीवाला अमृतानुभव देणारी ती जगन्माता आहे.... तिचे अनंत उपकार फिटणे अशक्यच!! तिला शतशः वंदन असो... जय श्री राम,,