१ मार्च पासून मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा सुरू…

मंत्री नितेश राणे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप..

मुंबई :
जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू करणे, ही संकल्पना मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्या संकल्पनेतूनच मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणे हा उपक्रम सुरू करत आहेत.मुख्यमंत्र्यांच्या या संकल्पनेला खऱ्या अर्थाने १ मार्च पासून सुरुवात होत आहे. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई आणि कोकणाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करत आहोत. अशी माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळात पत्रकार परिषदेत दिली.यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले,मुंबई ते विजयदुर्ग हा पहिला जलमार्ग रो रो सेवेचा असेल.येणाऱ्या काळात मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते महाड असे वेगवेगळे जल मार्ग यामध्ये वाढवणार आहोत.सुरू केले जाणार आहेत.असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. या बोट सेवेची संपूर्ण माहिती आणि तिकीट चे दर काय आहेत. याची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तिकीट बुकिंग देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहे. चांगला प्रतिसाद या तिकीट बुकिंग च्या माध्यमातून रोरो सेवेला मिळत आहे.कोकणात शिमगोत्सव सुरू होणार आहे. या शिमगोत्सवाला कोकणात जाण्यासाठी, सिंधुदुर्ग कोकणची जनता मोठ्या प्रमाणात सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देत आहे. हे तिकीट बुकिंग च्या माध्यमातून दिसत आहे. अशा पद्धतीचे प्रयत्न रो रो सेवेच्या माध्यमातून मुंबई कोकण किंबहुना मुंबईला अन्य राज्यांबरोबर जोडण्याचे काम आणि पर्यटन रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचे काम या जलवाहतुकीच्या माध्यमातून होणार आहे.पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार आपण करत आहोत.कोकणात जाण्यासाठी जेव्हा साडेचार ते पाच तासात कोकणात जाऊ शकू तेव्हा आपला जास्तीत जास्त वेळ वाचू शकतो.आंबा, काजू, मच्छीमारी व्यवसायालादेखील मोठ्याप्रमाणावर चालना मिळेल. पर्यटन आणि रोजगारालामोठ्याप्रमाणावर प्रोत्साहनमिळणार.रो रो सेवा संदर्भात सुरक्षिततेच्यासर्व परवानगी मिळाल्यानंतरचकाही ट्रायलकेल्यानंतर हि सेवासुरू करतआहोत.१मार्चपासून प्रवासीतिथेजायलासुरुवातकरतील.आपणत्याबोटीवरकाही डॉक्टरसुद्धाउपलब्धकरून देणारआहोत.जेणेकरूनकाही लोकांना समुद्रप्रवासाचा होणारा त्रासझाल्यासउपचारमिळेल.पर्यावरणपूरकविकासहाचमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांच्यासरकारचाहेतूआहे.असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top